क्षमा वीरस्य भूषणम्

लेख
लेखक : प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर

भगवान महावीर स्वामींनी धर्मव्यवस्थेच्या स्थापनेसाठी इंद्रभूती गौतम स्वामी इत्यादी अकरा गणधरांना पहिली दीक्षा दिली होती. महावीरांच्या निर्वाणानंतर इंद्रभूती गौतम स्वामींना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले, त्यामुळे पाचवे गणधर सुधर्म स्वामी यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आली. येथून गणगच्छ म्हणजे संघ – परंपरा सुरू झाली. 32 वर्षे गण परंपरेचे पालन करून सुधर्म स्वामींनी निर्वाण प्राप्त केले. परंपरेनुसार जंबू स्वामी गणाधीश झाले. चौसष्ट वर्षे धार्मिक उपासनेत चतुर्विध संघाला मार्गदर्शन करणारे ते शेवटचे केवली होते. केवलीच्या अनुपस्थितीत श्री संघाला श्रुता केवलीस यांचे मार्गदर्शन लाभले. त्यापैकी चौदा पूर्वाधार हे श्रुत केवली होते. त्यानंतर दहा पूर्वाधार आर्य स्थुलिभद्र झाले. येथे जिनकल्पी मुनी परंपरा संपली आणि स्थाविकल्पी मुनी परंपरा सुरू झाली. नंतरच्या काळातील अनेक मुनी परंपरा झाल्यावर आधुनिक काळाच्या पूर्वी वराहमिहीर यांचे आगमन जैन शास्त्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गणले गेले.तज्ञ वराहमिहीरांनी वराह संहिता रचली. स्थुलिभद्र हा पाटलीपुत्र येथील शाक्तल मंत्र्याचा ज्येष्ठ पुत्र होता. जैन परंपरेत ब्रह्मव्रताच्या भक्तीसाठी आर्य स्थुलिभद्र या नावाचे सकाळी स्मरण केले जाते. पुढे आर्य महागिरी आणि आर्य सुहस्ती नावाचे आचार्य होते. जिनकल्प परंपरेच्या खंडानंतर, स्थवीर परंपरेत आजपर्यंत अनेक गच्छ गण परंपरा विकसित झाल्या आहेत, ज्यांची संख्या 84 आहे. सध्या अनेक गणगच्छ परंपरा भगवान महावीरांनी त्यांच्या स्वतःच्या विचारांनी मांडलेल्या देशविराती आणि सर्वविराती धर्माच्या सम्यग जैन परंपरेचे पालन करीत आहेत.दिवस, काळ, महिने सरून जातात पण धर्माचे अधिष्ठान कायम रहाते.. याच न्यायाने क्षमाशील दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. होळी, दिवाळी, रक्षाबंधन यांसारखे सांसारिक सण लोकांना ऐहिक साधनांची, मनोरंजनाची आणि भौतिक इच्छा पूर्ण करण्याची इच्छा निर्माण करतात. तर संवत्सरीचा दिवस हा लोकोत्सव आहे. आत्मशुद्धीचा, जग-मैत्रीचा आणि संसारी मानवाला सुधारण्याचा हा दिन आहे.या पवित्र दिवसांत पारायण केलेल्या “कल्पसूत्र” या महान पवित्र ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेऊन संवत्सरी हा महान सण, क्षमा दिन म्हणून ओळखला जातो. कुठल्याही प्रकारची मनुष्य विघातक शक्ती उपद्रव न माजवता सुख-शांतीने समाजोन्नती करावी. असे वाटत असेल तर क्षमेसारख्या परम तसेच पवित्र तत्त्वाचा अंगीकार केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. क्षमा ही अस्वस्थ समाजाला निरोगी करण्यासाठी मिळालेली एक संजीवनी आहे. जिथे अस्वस्थता असते, तिथे सुख-शांती निवास करू शकत नाही. सुखशांतीच्या प्राप्तीसाठी मानवी मूल्याचा विसर पडता कामा नये. क्षमा, सत्य, अहिंसा, प्रेम, अपरिग्रह, स्वाभिमान, स्वावलंबन, स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांच्या साहाय्याने मनुष्य सुखी जीवन जगू शकतो. या मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य व्यतीत केले; त्यांच्या बळावरच आज समाज उन्नत अवस्थेकडे मार्गक्रमण करतो आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहीजे. हिंसेने मनुष्याचे मन दबले जाते. क्षमेने ते जागृत होते आणि उमलते. हिंसेने बुद्धी कुंठीत होते, विवेक मलीन होतो आणिआत्मा भयभीत होतो. क्षमा केल्यास त्या सर्वामध्ये नवीन स्फूर्ती येते, सारासार विवेक जागृत होतो म्हणून हिंसेपेक्षा क्षमेची नैतिक श्रेष्ठता अधिक आहे. आत्म्यामध्ये राग, द्वेष, मोह इत्यादींची निर्मिती होणे, ही हिंसा होय आणि न होणे म्हणजेच क्षमा होय, भारतीय संस्कृतीतील अनेक रत्नांपैकी क्षमा एक अनमोल रत्न आहे. हिंसेपेक्षा क्षमाशील होण्यात अधिक वीरपणा आहे. पापाचे पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची ताकद फक्त क्षमेतच आहे.क्षमा या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. या शब्दाचा संबंध शरीर आणि मन या दोन्हींशी आहे. केवळ शारीरिक इजा न पोहोचविणे म्हणजे क्षमा नव्हे तर दुसऱ्याच्या मनालादेखील इजा अथवा त्रास न देणे म्हणजे क्षमा होय.जैन धर्माने अतिशय विचारपूर्वक क्षमा तत्त्वाचा स्वीकार आपल्या जीवनात केला आहे. यामुळेच त्यांच्या अंगी सद्सद्विवेकबुद्धी, सहनशीलता, सत्याग्रही वृत्ती, प्रेम, दयाळूपणा, ममता, निर्णय घेण्याची क्षमता तसेच नेतृत्व करण्याची कला अवगत होती. मानवतेच्या मंदिरात या तत्वाचे स्थान अतिशय उच्च आहे.

जैन धर्माच्या मते क्षमा म्हणजे मर्यादा, अहंकारशून्यता नि विनम्रता.. क्षमेचा मार्ग म्हणजे सत्यशोधनाचा मार्ग होय. म्हणून तर तिच्यात एवढी ताकद आहे की, ती शत्रूंनाही प्रेमळ मित्र बनविते, त्यांच्याविषयीचा द्वेष काढून टाकते. मनुष्याच्या अंगी दुःख सहन करण्याची अपार क्षमता निर्माण करून देते. त्यांच्यासाठी सारे विश्व एक कुटुंबच असते. क्षमावादी मनुष्य आपोआपच ईश्वराचा सेवक बनतो.’जिओ और जिने दो’ हा संदेश देणान्या भगवान महावीरांनी ‘क्षमा विरस्य भूषणम् ‘ ही शिकवण दिली. या तत्त्वाची महानता एका संताच्या आचरणातून आपल्याला पाहायला मिळते. ती अशी- संत एकनाथांना नदीच्या पात्रात एकदा विंचू सतत डंख मारत होता. प्रत्येक वेळी एकनाथ त्याला अभय देत बाजूला सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न करीत. असे बरेचदा झाले तेंव्हा एका महानुभावांनी एकनाथाना विचारले की, तो विंचू आपल्याला सतत डसतो आहे. आपण त्याला मारत का नाहीत? तेव्हा
नैसर्गिक कार्य करीत असतो, अशा प्रसंगी मनुष्याने त्याच्या अस्तित्वावरच घाला घालता कामा नये. ही एक प्रकारची हिंसा होय.म्हणून मी विंचवाचे देखील क्षमा करतो.तेव्हा क्षमा करण्याची पवित्र घोषणा आजच्या घडीला श्रावक करतो, स्वतःचे आणि इतरांमधील मतभेद बाजूला ठेवून, सर्व वैयक्तिक वैरभाव सोडून, तुमच्या सर्व प्रेमळ नातेवाइकांशी जिव्हाळ्याचे मतभेद सोडविण्यासाठी, आपल्या चुका सौम्य भावनेने स्वीकारा आणि माफी मागा – हे संवत्सरीचे वैशिष्ट्य आहे. या शुभ मुहूर्तावर मैत्री आणि सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून, शत्रुत्व विसरून वर्तमान शत्रूला क्षमा करणे हेच खरे जीवन आहे.,असे जैन धर्म सांगत असतो, म्हणूनच आज प्रत्येक जण एक दुसर्याला
“खामेमि सव्व जीवे, सव्वे जीवा खमन्तु मे,
मिट्टी में सव्व भू ए सु, वैरम् मज्झ न केन इ “
असे म्हणत क्षमायाचना करीत असतात. जैनम् जयति शासनम्.

– प्रा. जवाहर मुथा जैन, अहमदनगर

1 thought on “क्षमा वीरस्य भूषणम्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *